ताज्या घडामोडी

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या अखेर मान्य, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ज्यूस पिऊन सोडणार उपोषण

निर्भीड वर्तमान:- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला शब्द पुर्ण झाल्याची वेळ आली आहे. कारण सरकारने मनोज जरांगे-पाटील Manoj Jarange Patil यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सरकारी शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी मध्यरात्रीच्या सुमारास नवी मुंबईत दाखल झालं. या शिष्टमंडळासोबत मनोज जरांगे पाटील यांची रात्री उशीरापर्यंत चर्चा सुरू होती. यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत. शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जरांगे उपोषण सोडणार आहेत.

राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या मागन्या मान्य केल्यात. यामुळे मराठा समाजाला यश मोठं यश मिळाल्याचं मानलं जातंय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी सकाळी नवी मुंबईतील वाशीमध्ये दाखल होतील आणि त्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार आहेत. यानंतर वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक मोठी विजयी सभा देखील मनोज जरांगे पाटलांची होणार आहे.

मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलंय. त्यामुळे आमचा विरोध आता संपला आहे. आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!