ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक
Manoj Jarange Patil; जरांगे यांनी आता तोंड सांभाळून बोलावे; आता नेमकं जरांगेना यांना काय हवे ?
पुणे, निर्भीड वर्तमान:- Manoj Jarange Patil; जरांगे यांनी आता तोंड सांभाळून बोलण्याची आवश्यकता आहे. मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे होते ते सरकारने दिले आहे. आता नेमकं जरांगे पाटील यांना काय हवे आहे? असा सवाल भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी विचारला आहे.
जरांगेंना पाटील देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून राजकारण करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.तुमचा बोलविता धनी कोण आहे हे महाराष्ट्राला नीट माहित आहे. फ्रस्टेशनपोटी जरांगे टोकाची भाषा करत आहेत असेही दरेकर म्हणाले आहेत.
तर सरकारने, गृहखात्याने याची दखल घ्यावी. नाहीतर आम्हालाही सागर बंगल्यावर जशास तसे उत्तर द्यायला थांबावे लागेल असा ईशारा या वेळी देण्यात आला आहे.