दत्ताभाऊ चव्हाण यांची रिपाई (आठवले) महाराष्ट्राच्या संघटक-सचिव मातंग आघाडीपदी निवड

पुणे :- शिव, फुले, शाहू, आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवरती व आचारावरती चालणारे पुणे शहर सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातील दत्ताभाऊ चव्हाण यांची केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आरपीआय मातंग आघाडी अण्णासाहेब वायदंडे यांच्या हस्ते पश्चिम महाराष्ट्राच्या संघटक-सचिव मातंग आघाडीपदी निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब वायदंडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीपभाऊ कांबळे, महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव परशुराम वाडेकर, उपाध्यक्ष विलास पाटोळे व शहराध्यक्ष जाधव व आर पी आयचे निलेश अण्णा आगळे अरविंद शिंदे अण्णासाहेब लोखंडे व विशाल भाऊ ओव्हाळ व सुनील भाऊ होलबोल इत्यादी सहकारी उपस्थित होते.

माध्यमांशी बोलतांना विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पक्ष व संघटन वाढीसाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचे दत्ता चव्हाण यांनी सांगितले आहे.

Exit mobile version